राज्यामध्ये निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली, जुलै महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत अशी पूर्ण हप्तेही पंधराशे रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे, परंतु असे असताना सुद्धा महायुतीमार्फत निवडणुकीच्या वेळेस लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी 2100 रुपये महिन्याला देऊ अशी घोषणा करण्यात आलेली होती, परंतु आता मात्र सरकार या गोष्टीने चा अवलंब कधी करणार याकडे सर्व लाडक्या बहिनींचे लक्ष लागलेले आहे, कारण लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी येणार यांची वाट बघणे आता चालू झालेले आहे.
अनेकांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे की, लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार किंवा लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणारच नाही, तर याबाबतच मुश्रीफ यांनी माहिती सांगितलेली आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देऊ परंतु ती सध्याची वेळ नाही योग्य वेळ आल्यानंतर रुपये लाडक्या बहिणींना देणार, असे त्यांनी स्पष्ट केले, कोणत्याही लाडक्या बहिणीचे पैसे कापले जाणार नाही, किंवा कोणत्याही लाडक्या बहिणीचे पैसे कमी केले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकारने निवडून आल्यानंतर एक 2100 रुपये देऊ असे जाहीर केलेले होते व त्याची अंमलबजावणी सुद्धा लवकरच सुरू करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही लाडक्या बहिणीचे पैसे कमी केले जाणार नाहीत.