देशामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्याचप्रमाणे दिवसेंदिवस विविध उपक्रम राबवून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे,संपूर्ण योजनांच्या व त्यांच्या लाभाच्या बाबतीत पारदर्शकता निर्माण व्हावी, याकरिता शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी तयार करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, देशातील अनेक शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात त्याचप्रमाणे कृषी योजनांचा लाभ घेत असतात असे सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक करण्यात आलेले असून, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावा.
मागील काही दिवसांपासून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी काढलेल्या नसेल अशा शेतकऱ्यांना कोणतेही योजनांचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे जे शेतकरी कृषी योजनांचा तसेच पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ इच्छितात अशांनी फार्मर आयडी काढावा, सीएससी सेंटर वर जाऊन त्या ठिकाणी सातबारा, आधार कार्ड, व मोबाईल क्रमांक या तीन बाबीवरून सहजरित्या फार्मर आयडी काढला जाऊ शकतो.
फार्मर आयडी चे फायदे
शासनाच्या माध्यमातून फार्मर आयडी काढणे बंधनकारक करण्यात येणार असून, याचे मुख्य कारण म्हणजे विविध प्रकारे देशात योजना राबवल्या जातात, परंतु प्रत्येक योजनेमध्ये असे काही नागरिक असतात जे घोटाळा करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेतात, त्यामुळे फार्मर आयडी च्या माध्यमातून शेतकऱ्यांची संपूर्ण खरी माहिती दिसेल व त्यामुळे कोणताही नागरिक अयोग्यरीत्या योजनाचा लाभ घेऊ शकणार नाही, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेणे सुद्धा फार्मर आयडी च्या माध्यमातून एकत्र ठिकाणी उपलब्ध होईल.
दरवर्षी शेतकरी पिक विमा योजनेत सहभाग नोंदवतात, परंतु दरवर्षी मोठ्या संख्येने बनावट पीक विमा अनेक नागरिक भरतात, अशा बनावट पिक विमा भरणाऱ्यांना सुद्धा फार्मर आयडी आल्यानंतर आळा बसणार आहे, व अशाप्रकारे कोणत्याही योजनेचा चुकीच्या पद्धतीने कोणालाही फायदा घेता येणार नाही, अशा प्रकारचा मुख्य उद्देश शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यामागे ठेवण्यात आलेला आहे.
1 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड होणार बंद, नवीन शासन निर्णय जारी